ऑपरेशन सिंदूर’ नंतर सैन्याचं कौतुक, पण नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण
Are the Pokemons only staying in your phone and game app? You will feel not sure after watching this funny videos.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला करारे प्रत्युत्तर दिले. या धाडसी आणि यशस्वी मोहिमेमुळे संपूर्ण देशात भारतीय जवानांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. सैन्य दलाने दाखवलेली शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात असताना, काही राजकीय वक्तव्यांमुळे मात्र वातावरण दूषित झालं आहे.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला करारे प्रत्युत्तर दिले. या धाडसी आणि यशस्वी मोहिमेमुळे संपूर्ण देशात भारतीय जवानांचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. सैन्य दलाने दाखवलेली शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात असताना, काही राजकीय वक्तव्यांमुळे मात्र वातावरण दूषित झालं आहे.
मध्य प्रदेशातील मंत्री आणि भाजप नेते विजय शाह यांनी काही दिवसांपूर्वी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर तसेच विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी या विधानाचा तीव्र निषेध केला. त्यानंतर वाढत्या दबावामुळे विजय शाह यांनी खुलं पत्र लिहून माफी मागितली. “माझ्या वक्तव्याचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता,” असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र, या वादाची धग अजून शमलेली नसताना, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या ताज्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. संपूर्ण देश आणि लष्कर हे पंतप्रधान मोदी यांच्या चरणी नतमस्तक झाले असल्याचे विधान त्यांनी जबलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर्सच्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले. ‘‘आम्ही पंतप्रधान मोदी यांचे आभार मानू इच्छितो. सगळा देश आणि लष्कर हे त्यांच्या पायी नतमस्तक झाले आहे, मोदींनी जे उत्तर दिलंय, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असे विधान देवडा यांनी केले.
या विधानावर तात्काळ प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेक माजी लष्करी अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी देवडा यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावरही ‘#RespectSofiaQureshi’ हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. सैन्यातील महिला अधिकाऱ्यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या विधानांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे.