रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडाराडा जमा
ससाणे नगर हडपसर मुख्य रस्त्यावर गेले सहा महिन्यापासून मैलापाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे काम सुरू असल्याने रस्ता खोदून ठेवण्यात आला होता.
त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडाराडा जमा झाला होता. अशातच मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुवाधार बॅटिंग केल्यामुळे रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला असून दुचाकीस्वार पादचारी यांना रस्त्यावरून जाताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
ठेकेदार हा रस्ता कधी करणार असा सवाल आता उपस्थित होत आहे.
इतके दिवस मैला वाहिनी बदलण्याचे काम चालू असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडाराडा होता. धूळ होती हा त्रास देखील ससाणे नगर मधील नागरिकांना झाला.
आणि आता काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने रस्ता बनवणे गरजेचे असताना ठेकेदार मात्र रस्ते दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रस्ता दुरुस्त नक्की कोण करून देणार असा सवाल आता नागरिक विचारत आहे
वृद्ध महिला विद्यार्थी दुचाकी स्वार सायकल स्वार कर्मचारी खाजगी कर्मचारी हे सर्व सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात या रस्त्याचा वापर करतात. मान्सून पूर्व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे या रस्त्याची दाणादाण उडालेली आहे. पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नवनाथ तरुण मंडळ चौकात वाहतुकीचे सिग्नल फक्त नावालाच फसवले आहे काय असा संवाद ससान नगर नागरिकति समितीचे सदस्य दिलीप गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक रहिवासी मोहनलाल बलाई म्हणतात की आम्ही लेखी तक्रार करून सुद्धा या ठिकाणी काळेपडळ वाहतूक विभागाचे अधिकारी आमच्या अर्जाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे नवनाथ तरुण मंडळ चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी रोज पाहायला मिळते.
ही सिग्नल चालू कधी होणार वाहतूक कर्मचारी येथे नियुक्त कधी करणार असा सवाल ससा नगर मधील नागरिक महेश ससाने करत आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीधर देसाई म्हणतात की आमच्या सर्व वृद्धांना या रस्त्यावरून चालणे म्हणजे जीव मोठी घेऊन चालणे असे वाटत आहे.
सातव नगर येथील श्रीराम चौकामध्ये रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली होती.
रुपेश राऊत म्हणाले की हडपसर भागातून दोन नैसर्गिक ओढे वाहत असून त्याची अद्याप साफसफाई झाली आहे की नाही हे मात्र सांगता येत नाही कारण मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्यावर सदर ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोसायटीत जमा झाले होते.
सय्यद नगर मधील स्थानिक रहिवासी खंडेराव जगताप म्हणाले की दोन महिन्यापूर्वी लेखी तक्रार करून सुद्धा वानवडी रामटेकडी शेतकरी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या भागात आमच्या येथील लेन नंबर 17 मध्ये महिला पाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमधील स्वच्छता केली जात नाही.
स्वच्छता न केल्यामुळे पावसाचे पावसाचे पाणी चेंबर मधून बाहेर येऊन आमच्या दुकानात आणि घरात जमा झाले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे,तक्रार त्यांनी केली आहे.